दिनांक १२/३/२०१९रोजी यवतमाळ जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मिटींग पक्षाचे सर्वेसर्वा लोकनेते माननीय आमदार मनोहर भाऊ नाईक साहेबांचे अध्यक्षतेत झालेल्या मिटींगमध्ये जिल्हाध्यक्ष तथा माननीय आमदार खा़जा बेग साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्षाच्या कार्या ची जेष्ठ नेते मनोहर भाऊ नाईक साहेबांनी प्रशंसा केली असून सर्व कार्यकर्त्यांनी यवतमाळ जिल्ह्यातील तीन लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्षांच्या  उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करून राष्ट्रीय पक्ष अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेबांचा आणि काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांचा आत्मविश्वास संपादन करण्यासाठी त्यांचे हात मजबूत करावे असे आवाहन केले जिल्हाध्यक्ष आमदार खा़जा बेग साहेबांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते मनोहर भाऊ नाईक साहेबांच्या शब्दांमुळे माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला आदरणीय नेते शरद पवार साहेबांनी मला राष्ट्रवादी पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली असून मी आपल्या संपूर्ण कार्यकर्त्यांच्या सहकार्याने प्रथम जिल्ह्यातील शेतकरी शेतमजुरांची परिस्थीती पाहता जिल्हा दुष्काळ ग्रस्त जाहीर करावे ह्या मागणी करता आर्णी ते यवतमाळ पर्यंत ४५ कि.मि.पद यात्रा केली आणि राज्य सरकारला यवतमाळ जिल्ह्याला दुष्काळ ग्रस्त जाहीर करावा लागला आहे सदर मिटींगमध्ये नानाभाऊ गाडबैले,वसंतरावजी घुईखेडकर,क्रांती ताई राऊत,यांनी आपले विचार व्यक्त केले प्रा.शिवाजी राठोड,रियासत अली,उत्तमराव शेळके, इनायत जनाब,शेख कय्युम भाई,प्रा.बिलाल सर,तालंनकर,मतीन खान,हाजी खाजा भाई कुरेशी,एजाज़ सर,बि.जी.राठोड,वहाब भाई,आझाद पटेल,संजय देशमुख,लियाकत खान,रविंद्र महल्ले आणि जैनुल सिद्दीकी व अनेक मान्यवर पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थीती होती प्रस्ताविक व संचालन हरिश कुडे यांनी केले तर आभार राठोड साहेब यांनी मानले.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

MAHAAAGHADI KI PAHELI SABHA NANDED